220 हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार
महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका 21 ऑक्टोबरला जाहीर झाल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष निवडणूक मोहिमांमध्ये सध्या व्यस्त आहेत . याचदरम्यान बीजेपीने महाजनादेश यात्रेचे आयोजन केले होते आणि ही मोहीम सर्वार्थाने यशस्वी ठरली . महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने बीजेपीच्या नेत्यांना बीजेपी कार्यकर्ते आणि मतदारांशी सुसंवाद साधण्याची संधी मिळाली . त्याचप्रमाणे या मोहिमेच्या माध्यमातून लोकांच्या समस्या जाणणे आणि विविध सूचना देखील मागवल्या गेल्या . महाराष्ट्र बीजेपी अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की महाजनादेश यात्रा ही एक उत्कृष्ट निवडणूक मोहीम असून या मोहिमेला मिळालेले प्रचंड यश आणि माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता यामुळे येत्या निवडणुकांमध्ये 220 हून अधिक जागा बीजेपी निश्चितच जिंकणार आहे . श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना बीजेपीचा 220 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार स्पष्ट केल...