मराठा समुदायाच्या आरक्षणाच्या निर्णयावर प्रतिक्रिया
मराठा समुदायाचे आरक्षण ही महाराष्ट्राच्या इतिहासामधील एक अत्यंत प्रलंबित मागणी होती . या मागणीसंदर्भात कृती करण्याचा प्रयत्न अगोदरच्या सर्व सरकारने केला . परंतु यामध्ये कोणत्याच सरकारला यश आले नव्हते , या परिस्थितीत जेव्हा बीजेपी सरकार राज्य अस्तित्वात आले तेव्हा विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि बीजेपी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला . परंतु त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले असून माननीय मुख्यमंत्री श्री . देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा समाजाला आरक्षण प्राप्त करून दिले आहे आणि या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे . माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबरच राज्याचे महसूल मंत्री श्री . चंद्रकांत दादा पाटील हेदेखील या अभूतपूर्व निर्णयासाठी श्रेयस्कर मानले जातात . ते मराठा आरक्षण निर्णयासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत ....